पानिपतावरील संक्रांत..

संपूर्ण महाराष्ट्र संक्रातीच्या आनंदात होता आणि पानिपतच्या रणांगणावर प्रत्यक्ष संक्रात कोसळली होती. घरादारात रांगोळ्यांचे सडे पडले होते, तर पानिपतावर रक्ताचे सडे. महाराष्ट्रातल्या आयाबहिणीच्या माथ्यावर कुंकू सौभाग्य सजवत होत. तर महाराष्ट्रातल्या लेकीसूनांचं सौभाग्य मराठ्यांच्या सौभाग्यासाठी पानिपतावर झुंझत होतं.
                         
दुपारपर्यंत मराठी सैन्य विजयाकडे झुकले होते. लढाईवर मराठ्यांचा ताबा होता. काही दगाबाज, फुटीर यांमुळे सैन्य वेढ्यात सापडले आणि रक्ताचे पाट वाहिले. १ लाख बांगडी फुटली, ९ लाखबांगड्याचा चुराडा झाला, २७ मोहरा हरवल्या, कित्येक खुर्दा झाला त्याचा थांगपत्ता नाही. या युद्धात जवळपास चाळीस हजार मराठी योद्धे, तसेच स्त्रिया, पुरुष मरण पावले आणि २२ हजार मराठी युद्धकैदी गुलाम म्हणून अहमदशहा अब्दालीने आपल्याबरोबर अफगाणिस्तानात नेले.
पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील मराठ्यांचा पराक्रम पाहून मराठे 'हार कर भी जित गए' असे वर्णन अनेक इतिहासकार करतात. याच आठवणीने आजही तिळगुळ आम्हाला गोड लागत नाहीत. पानिपतच्या रूपाने महाराष्ट्रातील प्रत्येक घराघराने हि संक्रांत अनुभवली.
त्या धारातीर्थ शूरवीरांना नमन..
जे मऱ्हाठे गेले अस्मिता जपण्यासाठी,
जे मऱ्हाठे लढले धर्मरक्षणासाठी,
जे मऱ्हाठे धारातीर्थ पडले देशासाठी,
जे मऱ्हाठे झुंझले दिल्लीच्या तख्तासाठी.
त्या मऱ्हाठ्या शूरवीरांना मनःपूर्वक शतशः नमन..

No comments:

Post a Comment