रसिकप्रांतात व.पु.काळे माहीत नाहीत असा रसिक शोधुन सापडणार नाही. हि पोस्ट सगळ्याच रसिकांसाठी आहे. ज्यांना व.पु. माहीती आहेत, आवडतात त्यांच्यासाठी. आणि ज्यांना माहिती नाहीत अशांसाठी सुद्धा. मला खात्री आहे, वपुंचे विचार वाचताना तुम्हांस नक्कीच आनंद होईल...!
===============================
"प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही,
कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाठतातच,
पळवाटा मुक्कामाला पोहचवत नाहीत,
मुक्कामाला पोहचवतात ते सरळ रस्तेच..."
---------------------------------------------------------------
"स्वप्न संपल की सत्य बोचु लागतं, उदबत्या जळुन गेल्या तर मागे राखेचा सडा ऊरतो. राखेला सुंगंध नसतो. स्वप्नाला सुत्र नसत.
तरी मी त्याला विचारलं,
"स्वप्नांवर माणुस जगतो का रे ?"
तो म्हणाला,
" नाही ! स्वप्नांवरच माणुस झोपतो, रमतो. पण जाग येईपर्यंत !
जागेपणीही स्वप्नच ऊराशी बाळगली तर परत झोपण्याची वेळ येते माणसावर "
मी बुवा स्वप्नांवरच जगतो. स्वप्नांचा आणि सुंगंधाचा फ़ार जवळचा संबंध असतो, बरोबर आहे, शेवटी दोन्हीची राख होते."
---------------------------------------------------------------
" 'स्त्री’ ला जन्माला घालताना परमेश्वराने तिला विचारलं, 'तुला बुद्धी हवी का सौंदर्य?’ तेंव्हा ती स्त्री म्हणाली, 'बुद्धीची गरज नाही, सौंदर्यच दे! 'का?' 'बुद्धीच्या सामर्थ्यावर सौंदर्य मिळवता येत नाही, पण सौंदर्याच्या जोरावर बुद्धी विकत घेता येते."
---------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------
"देखणी माणसं सगळ्यांनाच मोहात पाडतात. पण एखाद्या देखण्या माणसाबद्दल आपलेपणाची भावना कधी निर्माण होते ?-
तो प्रेमळ असेल तर. लाघवी, नम्र, मनमिळाऊ असा वैष्णवजन असेल तर. उन्मत्त सौंदर्यावर कोण लुब्ध होईल ?"
---------------------------------------------------------------
''भूतकाळात झालेल्या अपमानाचे अश्रूच भविष्यातल्या पायवाटेवर शिंपडायचे असतात. म्हणजे अनोळखी पायवाट त्या सड्यामुळे परिचयाची होते. नव्याने होणाऱ्या अपमानांची शल्यं बोथट होतात.''
---------------------------------------------------------------
"एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्याचा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते. कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला "बाळपणीचा काळ सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणुन ती अजुनही ऊडु शकते. आपण जमिनीवरच आहोत."
---------------------------------------------------------------
"आमचा देव दगडाचा नाही. आम्ही दगडात देव पाहणारी माणसं आहोत. दगडात देव असतोच, मुर्ती असतेच.दगडाचा फ़क्त नको असलेला भाग काढुन टाकायचा असतो.मुर्तीच्या भागाकडे फ़क्त लक्ष ठेवा. फ़ेकुन द्यायच्या भागाकडे नको. आणी मग ह्याच भावनेनं, निसर्गातल्या इतर गोष्टींकडे पहा. झाडं, नद्या, वारे, आकाश, जमीन आणी शेवटी माणुस. माणसातलाही नको असलेला भाग दूर करायला शिका. ह्याची सुरुवात स्व:तपासुन करा. स्व:तला नको असलेला भाग कोणता? तर ज्यापायी आपला आनंद, प्रगती, निष्टा आणी आत्मविश्वास ह्याला तडा जातो तो आचार, तो विचार हा टाकायचा भाग.."
---------------------------------------------------------------
"प्रॉब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतचं. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं या तिन्ही गोष्टीपलिकडचा प्रॉब्लेम अस्तित्वात नसतो."
---------------------------------------------------------------
"एकाकीपण वेगळं , एकांत वेगळा. परीसराचं मौन म्हणजे एकांत .आणि परिवारात असतानाही पोरकं वाटण हे एकाकीपण .एकाकी वाटलं तर मनसोक्त रडावं."
---------------------------------------------------------------
"अश्रु म्हणजे दुबळेपणा नाही. पावसाळी ढग जसे बरसल्यावर हलके होतात. आणि दिसेनासे होतात, तसा माणुसही हलका होतो. आकाशाजवळ पोहोचतो. असंच कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम " तुका आकाशायेवढा " असं लिहुन गेला असेल."
---------------------------------------------------------------
"आकाशात जेव्हा ऊपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पिटाळुन लावे पर्यंत संघर्ष असतो, त्याने गती घेतली की उरलेला प्रवास आपोआपच होतो . असच माणसाचं आहे.......समाजात एक विशिष्ट ऊंची गाठे प्रर्यंत सगळा संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित ऊंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती ऊंचीच सोडवते."
---------------------------------------------------------------
"सर्वात जीवघेणा क्षण कोणता ? खूप सद्भावनेनं एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काहीही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणा यावा, सद-हेतूंचीच शंका घेतली जावी, हा !"
---------------------------------------------------------------
"पावसातून भटकताना अंगावरचा शर्ट भिजतो, तेंव्हा काही वाटत नाही. तो अंगावरच हळू हळू सुकतो त्याचंही काही वाटत नाही.सुकला नाही तरी ओल्याची सवय होते.पण म्हणून कोणी ओलाच शर्ट घाल म्हटले तर....."
---------------------------------------------------------------
"प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही,कधी ना कधी ते पळणार्याला गाठतातच,पळवाटा मुक्कामाला पोहचवत नाहीत, मुक्कामाला पोहचवतात ते सरळ रस्तेच..."
---------------------------------------------------------------
"निर्णय चुकीचा आहे की बरोबर हे काळावर मोजायचं की बुध्दीवर ? बुध्दीच नसेल तर ३ तास दिले तरी पेपर कसा सोडवणार ?"
---------------------------------------------------------------
तुम्ही नुसते गुणी असून
चालत नाही.
ते गुण खळबळ न करता मान्य करणारा
समाज तुमच्याभोवती जमणं
याला महत्व आहे.
गुणी माणसाचं नाणं वाजणंच कठीण होऊन बसलंय.
---------------------------------------------------------------
प्रत्येक यशस्वी ठरलेल्या माणसाला आयुष्यात 'वेटिंग पिरियड' असतो. त्या काळातील वेदना ज्याच्या त्याला माहित असतात. पण प्रसूतिवेदनांशिवाय ज्यांना अपत्य प्राप्ती हवी आहे, त्यांच्याबद्दल काय बोलावे ? हाच जमाना सध्या वाढतोय.
------------------------------------------------------------
'उत्तम ड्रायव्हर जेव्हा अॅक्सिडेंट करतो तेव्हा तो ड्रायव्हिंग विसरलेला असतो का ? तरी अपघात होतात. पट्टीची पोहणारी माणसं, नेहमीसारखा उंचीवरून सूर मारतात ती वरच येत नाहीत केव्हा केव्हा. म्हणजे त्यांना पोहता येत नाही असं म्हणायचं का?
त्याचप्रमाणे चांगली शिकलीसवरलेली माणसं, दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडतात तेव्हा शिक्षण किंवा संस्कार विसरलेली असतात असं म्हणायचं का ?
तोही अपघाताच. जो नेहमी घडून जातो- तो अपघात.'
------------------------------------------------------------
कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाठतातच,
पळवाटा मुक्कामाला पोहचवत नाहीत,
मुक्कामाला पोहचवतात ते सरळ रस्तेच..."
---------------------------------------------------------------
"स्वप्न संपल की सत्य बोचु लागतं, उदबत्या जळुन गेल्या तर मागे राखेचा सडा ऊरतो. राखेला सुंगंध नसतो. स्वप्नाला सुत्र नसत.
तरी मी त्याला विचारलं,
"स्वप्नांवर माणुस जगतो का रे ?"
तो म्हणाला,
" नाही ! स्वप्नांवरच माणुस झोपतो, रमतो. पण जाग येईपर्यंत !
जागेपणीही स्वप्नच ऊराशी बाळगली तर परत झोपण्याची वेळ येते माणसावर "
मी बुवा स्वप्नांवरच जगतो. स्वप्नांचा आणि सुंगंधाचा फ़ार जवळचा संबंध असतो, बरोबर आहे, शेवटी दोन्हीची राख होते."
---------------------------------------------------------------
" 'स्त्री’ ला जन्माला घालताना परमेश्वराने तिला विचारलं, 'तुला बुद्धी हवी का सौंदर्य?’ तेंव्हा ती स्त्री म्हणाली, 'बुद्धीची गरज नाही, सौंदर्यच दे! 'का?' 'बुद्धीच्या सामर्थ्यावर सौंदर्य मिळवता येत नाही, पण सौंदर्याच्या जोरावर बुद्धी विकत घेता येते."
---------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------
"आपत्ती पण अशी यावी कि तिचा इतरांना हेवा वाटावा....व्यक्तिचा कस लागावा.पडायचंच असेल तर, ठेच लागुन पडू नये, चांगलं २००० फ़ुटांवरुन पडावं..म्हणजे माणूस किती उंचावर पोचला होता हे तरी जगाला समजेल. !"---------------------------------------------------------------
"देखणी माणसं सगळ्यांनाच मोहात पाडतात. पण एखाद्या देखण्या माणसाबद्दल आपलेपणाची भावना कधी निर्माण होते ?-
तो प्रेमळ असेल तर. लाघवी, नम्र, मनमिळाऊ असा वैष्णवजन असेल तर. उन्मत्त सौंदर्यावर कोण लुब्ध होईल ?"
---------------------------------------------------------------
''भूतकाळात झालेल्या अपमानाचे अश्रूच भविष्यातल्या पायवाटेवर शिंपडायचे असतात. म्हणजे अनोळखी पायवाट त्या सड्यामुळे परिचयाची होते. नव्याने होणाऱ्या अपमानांची शल्यं बोथट होतात.''
---------------------------------------------------------------
"एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्याचा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते. कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला "बाळपणीचा काळ सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणुन ती अजुनही ऊडु शकते. आपण जमिनीवरच आहोत."
---------------------------------------------------------------
"आमचा देव दगडाचा नाही. आम्ही दगडात देव पाहणारी माणसं आहोत. दगडात देव असतोच, मुर्ती असतेच.दगडाचा फ़क्त नको असलेला भाग काढुन टाकायचा असतो.मुर्तीच्या भागाकडे फ़क्त लक्ष ठेवा. फ़ेकुन द्यायच्या भागाकडे नको. आणी मग ह्याच भावनेनं, निसर्गातल्या इतर गोष्टींकडे पहा. झाडं, नद्या, वारे, आकाश, जमीन आणी शेवटी माणुस. माणसातलाही नको असलेला भाग दूर करायला शिका. ह्याची सुरुवात स्व:तपासुन करा. स्व:तला नको असलेला भाग कोणता? तर ज्यापायी आपला आनंद, प्रगती, निष्टा आणी आत्मविश्वास ह्याला तडा जातो तो आचार, तो विचार हा टाकायचा भाग.."
---------------------------------------------------------------
"प्रॉब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतचं. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं या तिन्ही गोष्टीपलिकडचा प्रॉब्लेम अस्तित्वात नसतो."
---------------------------------------------------------------
"एकाकीपण वेगळं , एकांत वेगळा. परीसराचं मौन म्हणजे एकांत .आणि परिवारात असतानाही पोरकं वाटण हे एकाकीपण .एकाकी वाटलं तर मनसोक्त रडावं."
---------------------------------------------------------------
"अश्रु म्हणजे दुबळेपणा नाही. पावसाळी ढग जसे बरसल्यावर हलके होतात. आणि दिसेनासे होतात, तसा माणुसही हलका होतो. आकाशाजवळ पोहोचतो. असंच कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम " तुका आकाशायेवढा " असं लिहुन गेला असेल."
---------------------------------------------------------------
"आकाशात जेव्हा ऊपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पिटाळुन लावे पर्यंत संघर्ष असतो, त्याने गती घेतली की उरलेला प्रवास आपोआपच होतो . असच माणसाचं आहे.......समाजात एक विशिष्ट ऊंची गाठे प्रर्यंत सगळा संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित ऊंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती ऊंचीच सोडवते."
---------------------------------------------------------------
"सर्वात जीवघेणा क्षण कोणता ? खूप सद्भावनेनं एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काहीही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणा यावा, सद-हेतूंचीच शंका घेतली जावी, हा !"
---------------------------------------------------------------
"पावसातून भटकताना अंगावरचा शर्ट भिजतो, तेंव्हा काही वाटत नाही. तो अंगावरच हळू हळू सुकतो त्याचंही काही वाटत नाही.सुकला नाही तरी ओल्याची सवय होते.पण म्हणून कोणी ओलाच शर्ट घाल म्हटले तर....."
---------------------------------------------------------------
"प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही,कधी ना कधी ते पळणार्याला गाठतातच,पळवाटा मुक्कामाला पोहचवत नाहीत, मुक्कामाला पोहचवतात ते सरळ रस्तेच..."
---------------------------------------------------------------
"निर्णय चुकीचा आहे की बरोबर हे काळावर मोजायचं की बुध्दीवर ? बुध्दीच नसेल तर ३ तास दिले तरी पेपर कसा सोडवणार ?"
---------------------------------------------------------------
तुम्ही नुसते गुणी असून
चालत नाही.
ते गुण खळबळ न करता मान्य करणारा
समाज तुमच्याभोवती जमणं
याला महत्व आहे.
गुणी माणसाचं नाणं वाजणंच कठीण होऊन बसलंय.
---------------------------------------------------------------
प्रत्येक यशस्वी ठरलेल्या माणसाला आयुष्यात 'वेटिंग पिरियड' असतो. त्या काळातील वेदना ज्याच्या त्याला माहित असतात. पण प्रसूतिवेदनांशिवाय ज्यांना अपत्य प्राप्ती हवी आहे, त्यांच्याबद्दल काय बोलावे ? हाच जमाना सध्या वाढतोय.
------------------------------------------------------------
'उत्तम ड्रायव्हर जेव्हा अॅक्सिडेंट करतो तेव्हा तो ड्रायव्हिंग विसरलेला असतो का ? तरी अपघात होतात. पट्टीची पोहणारी माणसं, नेहमीसारखा उंचीवरून सूर मारतात ती वरच येत नाहीत केव्हा केव्हा. म्हणजे त्यांना पोहता येत नाही असं म्हणायचं का?
त्याचप्रमाणे चांगली शिकलीसवरलेली माणसं, दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडतात तेव्हा शिक्षण किंवा संस्कार विसरलेली असतात असं म्हणायचं का ?
तोही अपघाताच. जो नेहमी घडून जातो- तो अपघात.'
------------------------------------------------------------
ह्या जगात पुरूषार्थ ह्या शब्दाचा अर्थ समजलेले पुरूष फार, म्हणजे फारच मोजके आहेत. पुरूषार्थ म्हणजे रसिकता. जबरदस्ती नव्हे, शारिरिक ताकद नव्हे, तर मानसिक ताकद. ज्याला ही मानसिक रसिकता समजली त्यालाच पुरूषार्थ समजला. असा पुरूष, पुरूष असला तरीही कोमल असतो. तो कुणावरही जबरदस्ती करीत नाही.
------------------------------------------------------------
‘माझी परमेश्वरावर अपार भक्ती आहे. त्याने निर्माण केलेली सृष्टी पहा. तिथं सगळं अमाप आहे, विराट आहे, प्रचंड आहे. इथं लहान काहीच नाही. एक माणूस पहा! केवढी विराट निर्मिती माणूस म्हणजे! पर्वत जेवढा प्रचंड, समुद्र जेवढा अमर्याद, वनश्री जेवढी गुढ, तसाच प्रत्येक माणूस प्रचंड, अमर्याद आणि गूढही. माणसाला बहाल केलेली पंचेद्रिय हीच त्याची साक्ष. नजरेची दुनिया, नादाची दुनिया आणि स्पर्शाची दुनिया. सगळं विराट आणि म्हणूनच नेहमी वाटतं की ज्या परमेश्वराने जीवन एवढं विराट केलं तो त्या विराट जीवनाचा शेवट जीवनापेक्षा लहान गोष्टी करणार नाही.’ ‘माझी श्रध्दा आहे, की परमेश्वराने निर्माण केलेला मृत्यू हा जीवनापेक्षा विराट आहे, जीवनापेक्षा लोभस असणार,’
------------------------------------------------------------
प्रेम भक्ती जिथं उगम पावते तिथं संकेत नसतात, असते फक्त उत्कटता! तिथे बंधन नसतं, असते फक्त अमर्यादता. त्यातली दाहकता पचवायला पोलादी छाती लागते. त्यातून जे नंदनवन फूलतं ते पहायला दोन डोऴे पुरत नाहीअरे डोळे पाहू शकणार नाहीत असं दाखवणारं निराळे इन्द्रिय लागतं. सामान्यांच्या वाटणीला हे प्रेम यायचं नाही निभावण्याची ताकद असणाऱ्या माणसांचाच तो प्रांत आहे आणि प्रेमाच्या प्रांतात अशी उत्कटतेने उडी घ्याल ,मागचा पुढचा विचार न करताना, धाव घ्याल तेव्हाच तुम्हाला भक्ती म्हणजे काय ते समजेल..
------------------------------------------------------------
------------------------------------------------------------
‘माझी परमेश्वरावर अपार भक्ती आहे. त्याने निर्माण केलेली सृष्टी पहा. तिथं सगळं अमाप आहे, विराट आहे, प्रचंड आहे. इथं लहान काहीच नाही. एक माणूस पहा! केवढी विराट निर्मिती माणूस म्हणजे! पर्वत जेवढा प्रचंड, समुद्र जेवढा अमर्याद, वनश्री जेवढी गुढ, तसाच प्रत्येक माणूस प्रचंड, अमर्याद आणि गूढही. माणसाला बहाल केलेली पंचेद्रिय हीच त्याची साक्ष. नजरेची दुनिया, नादाची दुनिया आणि स्पर्शाची दुनिया. सगळं विराट आणि म्हणूनच नेहमी वाटतं की ज्या परमेश्वराने जीवन एवढं विराट केलं तो त्या विराट जीवनाचा शेवट जीवनापेक्षा लहान गोष्टी करणार नाही.’ ‘माझी श्रध्दा आहे, की परमेश्वराने निर्माण केलेला मृत्यू हा जीवनापेक्षा विराट आहे, जीवनापेक्षा लोभस असणार,’
------------------------------------------------------------
प्रेम भक्ती जिथं उगम पावते तिथं संकेत नसतात, असते फक्त उत्कटता! तिथे बंधन नसतं, असते फक्त अमर्यादता. त्यातली दाहकता पचवायला पोलादी छाती लागते. त्यातून जे नंदनवन फूलतं ते पहायला दोन डोऴे पुरत नाहीअरे डोळे पाहू शकणार नाहीत असं दाखवणारं निराळे इन्द्रिय लागतं. सामान्यांच्या वाटणीला हे प्रेम यायचं नाही निभावण्याची ताकद असणाऱ्या माणसांचाच तो प्रांत आहे आणि प्रेमाच्या प्रांतात अशी उत्कटतेने उडी घ्याल ,मागचा पुढचा विचार न करताना, धाव घ्याल तेव्हाच तुम्हाला भक्ती म्हणजे काय ते समजेल..
------------------------------------------------------------
भारत देशाला 'सुजला' म्हणायचं पण पावसाची शाश्वती नाही. 'सुफला' म्हणायचं पण परकीय मदतीशिवाय श्वास घेता येत नाही. मग हे शब्द खोटे आहेत का? मुळीच नाही कोट्यवधी अशिक्षित, मागासलेल्या स्त्रियांच्या डोळ्यातलं न आटणार पाणी पाहिल्यावर 'सुजला' का म्हणायचं नाही? एका सेकंदाला एक मुल जन्माला घालणारा देश `सुफला`च नाही का? ती मुल नागडीउगडी असली म्हणून काय झालं? उपाशी राहीली तरी बिघडत नाही. त्यांच्याच जिवावर राज्यकर्त्यांची पोट सुटताहेत. त्यांना हवी ती फळ मिळताहेत, तेंव्हा हा देश 'सुफला'च....
------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment