वपु एक विचार..!!


रसिकप्रांतात व.पु.काळे माहीत नाहीत असा रसिक शोधुन सापडणार नाही. हा "वपु एक विचार " संग्रह सगळ्याच रसिकांसाठी आहे. ज्यांना व.पु. माहीती आहेत, आवडतात त्यांच्यासाठी. आणी ज्यांना माहीती नाही अशांसाठी सुद्धा. खात्री आहे तुम्हा वाचकांना हे वाचून नक्कीच आनंद होईल !

-------------------------------------------------
वपुं काळेंची काही निवडक पुस्तके..

 

सगळी उत्तरं आपल्याजवळच असतात. समस्या आपली आणि त्याचं उत्तरं मात्र इतरत्र असे घडत नाही. उत्तराची मागची बाजू म्हणजे समस्या. आपण फक्त आपली बघण्याची दिशा बदलायची. स्वतःकडेच नीट पाहायचं. 'पिंडी ते ब्रह्मांडी' असं म्हणतात ते सत्य आहे.
~ वपु काळे | मायाबाजार
-------------------------------------------------------------------
"आयुष्यात जो अत्यंत महत्वाचा निर्णय असतो,की ज्या निर्णयामुळे सगळ्या भवितव्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे,अशा क्षणी कुणावरही विसंबुन रहायचं नाही.आपला बेत फ़सला किंवा कुणीतरी उधळुन लावेल अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नाही.निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहीजे."
  ~ वपु काळे | तप्तपदी
-------------------------------------------------------------------"लग्नासारखा एक निर्णय आबाद किंवा बरबाद करायला पुरेसा असतो.अशा वेळी व्यक्ती स्वतंत्र हवी."
  ~ वपु काळे | तप्तपदी
-------------------------------------------------------------------
माणसं चंद्रासारखी शीतल का होत नाहीत? एकच कारण.
ती चंद्राची उपेक्षा करतात. रात्री झोपा काढतात. एका चतुर्थीत सगळं देणं चुकवतात. त्यातही भक्ती किती? आणी अहंकार किती?
उपवास करणार्‍यांचा परिवारावर एक अनामिक पगडा असतो. दडपण असतं. चंद्राची शीतलता उचलणं हेच व्रत. त्याच्या शीतलतेचं अनुकरण केलं तर घरात चांदणं पहुडेल.
पण त्या शीतलतेशी घनिष्ठ मैत्री हवी. ती झोपून कशी मिळणार?
त्यासाठी हे असं चांदण्यांशी संधान जुळवलं पाहिजे.
समुद्रासारखा जीवही चंद्र दिसला की झेपावतो. मिठाला जागतो. मग माणसं अशी थंड का? ती शांत असतील तर उत्तम. पण ती थंड म्हणजे निर्विकार असतात.
~ वपु काळे | सखी
-------------------------------------------------------------------

संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.
'अंत' आणि 'एकांत' ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.
~ वपु काळे | प्लेझर बॉक्स
-------------------------------------------------------------------
It is better to have loved and lost than never to have loved at all !
~ वपु काळे | प्लेझर बॉक्स
-------------------------------------------------------------------
कितीही मोठा आवाज केला गेला तरीही तरी तो जास्तीत जास्त किती मैलांचा प्रवास करील? केव्हातरी नि:शब्दाची सीमा सुरू होणारच. मौनाचं तसं नाही. त्याला सीमा नाही. म्हणुनच आक्रोशाला शब्द असतात. अतीव आनंद 'मूक' असतो. माणूस नि:शब्द होतो.
~ वपु काळे | सखी
-------------------------------------------------------------------
श्वास म्हणजे विश्वाशी सोयरीक. म्हणूनच अत्यंत जिवाभावाची व्यक्ती गेली तर 'मी एक क्षण जगणार नाही' असं अनेक म्हण्तात आणि मागे खुप वर्षे राहतात. त्यचं प्रेम खोटं नसतं, पण विश्वाशी सोयरीक तुटलेली नाही हे त्यांना माहीत नसतं.
~ वपु काळे | सखी
-------------------------------------------------------------------
अत्यंत महागडी, न परवडणारी खर्‍या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे "आयुष्य".
~ वपु काळे | प्लेझर बॉक्स
-------------------------------------------------------------------
प्रकाश रोकठोक असतो. लपवालपवीचा खेळ फ़क्त अंधारापाशी असतो. अंधार आणी आतल्या गाठीची माणसं सारखीच.
~ वपु काळे | सखी
-------------------------------------------------------------------
जोपर्यंत स्व:तच्या विचारांचा शोध स्वतलाच लागलेला नसतो तोपर्यंत ठीक चाललेलं असतं सगळ्यांचं.
~ वपु काळे | प्लेझर बॉक्स
-------------------------------------------------------------------
प्रवासात हे असे डोंगराएवढे उंच, आकाशाइतके विशाल, वृक्षांसारके सावली देणारे, खळखळाट करीत झेपावणारे प्रपात पाहिले म्हणजे मला पैसा-प्रतिष्टा, पद ह्यामागे धावणारा माणूस फ़ार केविलवाणा वाटतो.
~ वपु काळे | सखी
-------------------------------------------------------------------
जीवनाचा साथीदार म्हणुन 'क्ष' व्यक्तिला पसंत करायचं, त्या व्यकितबरोबर आयुष्य घालवायचं, त्याला शरिर अर्पण करायचं, पण मनाची कवाडं उघडी करायला मात्र तिथं वाव नसावा.हीच माणसांची केवढी मोठी शोकांतिका? ह्याला संसार म्हणायचं.
~ वपु काळे | प्लेझर बॉक्स
-------------------------------------------------------------------
समाज तप्त सुर्यासारखा असतो. आगीचा कितीही वर्षाव झाला तरीही ती सूर्यफ़ुलं सूर्याकडेच पाहत राहतात. तोंड फ़िरवीत नाहीत. माझ्यासारख्या निराधार बाईकडे समाज असाच बघत असतो. सूर्यासारखा रोखून. अशा समाजाला तोंड देतानाही टवटवीत रहायचं हे मला सूर्यफ़ुलांनी शिकवलं.
~ वपु काळे | सखी
-------------------------------------------------------------------
Love decides what is wrong, instead of who is wrong.
~ वपु काळे | प्लेझर बॉक्स
-------------------------------------------------------------------
माणुस नावाच्या एका अवाढव्य, अनाकलनीय यंत्राचा सेफ़्टी व्हाल्व्ह शब्द आणी संवाद हा आहे.
~ वपु काळे | प्लेझर बॉक्स
-------------------------------------------------------------------
पहिल्या वहिल्या भेटीत माणसं किती जवळची व्हावीत याला काही हिशोब असतो का? गणित असतं का?मैत्री म्हटलं की खरं तर हीशोब, गणितं वगैरे व्यवहारीक शब्द टीकतच नाहीत. तरीही हेच शब्द पटकन पुढाकार का घेतात?
~ वपु काळे | प्लेझर बॉक्स
-------------------------------------------------------------------
कुठलेही हिशोब न ठेवता जी गणीताप्रमाणे नेमकेपणा देते ती मैत्री.
~ वपु काळे | प्लेझर बॉक्स
-------------------------------------------------------------------
चार माणसातं राहायचं म्हणजे काही
काही गोष्टी कराव्या लागतात ह्या
बुरख्याखाली आपण स्वत:हाला
आयुष्यभर विकुन टाकतो. समाजाचा
आधार वाटायच्या ऐवजी रीत रिवाज
सांभालायला लावणार हे लोढणं आहे
अस वाटत. वेळी अवेळी चहा
करण्यापासुन अनेक गोष्टी हा समाज
आपल्याला करायला लावतो. खोटं आहे
का सांगा? घरात मॉडर्न गोष्टी हव्यात
त्याही समाजासाठीच.
~ वपु काळे। मी माणूस शोधतोय
-------------------------------------------------------------------
ज्या माणसाशी आपण मैत्री करतो, त्याला अंश:त का होईना, समृध्द करण्याची पात्रता आपल्यापाशी आहे का हे पहाव.
~ वपु काळे | सखी
-------------------------------------------------------------------
एक ओढा आहे. किंवा झरा समज. एका उडीत आपल्याला तो पार करता येईल असा नसतो. त्या प्रवाहाच्या मध्यभागी एक मोठा दगड असतो. त्याचा आधार देऊन दोन टप्प्यांत आपण पलीकडच्या तीरावर जातो. तो मधला दगड म्हणजे 'सेक्स'. ते साधन असावं. साध्य नसावं.
~ वपु काळे | सखी
-------------------------------------------------------------------
सावली देऊ शकणार्‍या वटवृक्षानं विश्रांतीला आलेल्या पांथस्थाला बाकीची झाडं सोडून तुला नेमका मीच सापडलो का, असं विचारायचं नसतं.
~ वपु काळे | सखी
-------------------------------------------------------------------
लेखकाच्या संदेशावर जग बदललं असतं तर समर्थांच्या मनाच्या श्लोकानंतर कोणत्याच वाड:मयाची, साहित्याची निर्मीती झाली नसती.
~ वपु काळे | सखी
-------------------------------------------------------------------
चांदी-शुध्द चांदीचीच भांडी काळी पडतात. त्यातली चांदी नाहीशी होत नाही. थोडं पाँलिश केलं की झालं.
  ~ वपु काळे | सखी
-------------------------------------------------------------------
जो शब्द नाकारतो तो विचारच नाकारतो.
~ वपु काळे | प्लेझर बॉक्स
-------------------------------------------------------------------
मैत्री म्हटलं की काय असावं काय नसावं ह्याचं चिंतन करावं.
~ वपु काळे | प्लेझर बॉक्स
-------------------------------------------------------------------
प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी मन धावत होतं. हे मनाचं प्रकरण छान आहे. जागा न सोडता ते हजारो मैल भटकतं आणि सगळ्यांना भेटतं. पण शरीर त्यापैकी एक दोन ठीकाणीच जाऊ शकतं.
~ वपु काळे | प्लेझर बॉक्स
-------------------------------------------------------------------
"समस्या आणि उत्तर ह्यात वेळ म्हणजे Time Factor असतो.Forth Dimension म्हणतात तो Factor.म्हणुनच एका उत्तराची वेळ टळली की दुसरं उत्तर शोधावचं लागतं."
  ~ वपु काळे | तप्तपदी
-------------------------------------------------------------------
कोणत्याही नव्या "अनुभवाला" समोर जाताना प्रत्येक मनात एकमेव ईच्छा असते. तो अनुभव चांगला असावा. अपेक्षापुर्ती करणारा असावा.
~ वपु काळे | प्लेझर बॉक्स
-------------------------------------------------------------------
जो माणुस जीवनाला कंटाळलाय, वैतागलाय त्यला एवढचं विचारावसं वाटतं "राजा, तू कधि लताचं गाणं ऐकलयंस? ' रसिक बलमा ' किंवा ' ओ बसंती ' डोळे मिटुन तंद्रित ऐकलयसं. आणी जर नसलसं तर ऐक.पुन्हा पुन्हा ऐकत रहा. तुला जगावसं वाटेल.आणी असं वाटत असतानाच तु वपुंच्या कथा ऐक. तुला कधिच मरावसं वाटणार नाही.
~ वपु काळे | प्लेझर बॉक्स
------------------------------------------------------------------
"उत्तम आणि उच्च पदवी हीसुद्धा ऎपतच आहे.नुसत स्वाभिमान आहे,पण कोणतीच पात्रता नाही ती माणसं जास्तीत जास्त मग्रुर असतात."
  ~ वपु काळे | तप्तपदी
-------------------------------------------------------------------वैरभावनेतली सहजता संपते आणि मग जाणिवेने शत्रुत्वाची भावना जोपासली जाते. ज्या कारणासाठी एखाद्या व्यक्तीशी एके काळी मैत्री झाली होती ती कारणे, त्याची ती गुणवत्ता आणि सौख्यात घालवलेला भूतकाळ, आमंत्रण देत राहतो, पण अहंकाराचा पहारेकरी फाटक सोडायला तयार नसतो. तो तुमची निर्भत्सना करत राहतो.
~ वपु काळे | मोडेन पण वाकणार नाही
-------------------------------------------------------------------
"समस्या आणि उत्तर ह्यात वेळ म्हणजे Time Factor असतो. Fourth Dimension म्हणतात तो Factor. म्हणुनच एका उत्तराची वेळ टळली की दुसरं उत्तर शोधावचं लागतं."
~ वपु काळे | तप्तपदी
-------------------------------------------------------------------
आपण सगळे अपूर्णच आहोत. परमात्मा म्हणजे पूर्णत्व. तोच कृष्ण. कृष्ण म्हणजे पूर्णत्वाप्रत नेणारी एक शिडी. एकेक पायरी चढेपर्यंत आपण सगळे अर्जुन. संभ्रम जेवढया प्रमाणात जास्त किंवा कमी, तेवढया प्रमाणात शिडीच्या पायऱ्या. उडी घेण्याचा क्षण म्हणजे संभ्रमसमाप्ती. हेच कृष्णत्व. अर्जुनाचा कृष्ण होण.
~ वपु काळे | आपण सारे अर्जुन
-------------------------------------------------------------------
'खंत' व 'पश्चाताप' या शापातून फक्त दोनच प्रकारची माणसे मुक्त होऊ शकतात. पहिला प्रकार निगरगट्टाचा; दुसरा 'जाणीवेनं जगणाऱ्यांचा'.
~ वपु काळे | इतर
-------------------------------------------------------------------
चांगलं आणि वाईट ह्या शब्दांना स्वतंत्र
अर्थ आणि अस्तित्व असतं का? ‘हो’
आणि ‘नाही’ ही. ‘तुलना’ नावाची
राक्षसीण जोपर्यंत मध्ये उभी राहत
नाही, तोपर्यंत ह्या शब्दांचा विहार
चालतो. तिने हस्तक्षेप केला की संपलं!
ही राक्षसीण येताना एकटी येत नाही,
तिच्याबरोबर तिची बहीण येते. ती
तुम्हाला बहीनीच्या स्वाधीन करते आणि
दुसर्‍यान मनाचा बळी घेण्यासाठी ती
निघुन जाते. ह्या बहीणीचे नाव
‘तडजोड’. ही तुम्हाला आयुष्यभर साथ
देते.
  ~ वपु । रंग मनाचे
-------------------------------------------------------------------
स्वतःचे अनुभव उगीचच इतरांना सांगू नयेत. इतरांना एक तर ते अनुभव खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत, असं वाटायला लागतं. ज्याने-त्याने स्वतःच्या मालकीचे अनुभव घ्यावेत.
~ वपु काळे | वपुर्झा
-------------------------------------------------------------------
निसर्ग आहे म्हणा किंवा नियती आहे
म्हणा. नियती माणसाला कोणत्या तरी
दालनात शिखरावर नेऊन पोहचवते
आणि त्याच, त्या दिलेल्या उंचीचा
हिशोब साधण्यासाठी,
जीवनाच्या दुसऱ्या दालनात त्याच
माणसाला अगदी सामान्य,
अगदी क्षुद्र करुन सोडते.
एका माणसाला छोटा करुन ती
दुसऱ्या‍ला मोठा करत नाही,
तर एकाच माणसात ती त्याला
इथं छोटा तर तिथं मोठा करते.
  ~ वपु । माणूस शोधतोय मी
-------------------------------------------------------------------
परिस्थिती बदलणारे आपण कोण?
गृहीत धरायची शक्ति एवढ्यासाठीच
वाढवायची, त्यामुळे 'मन'  नावाची एक
दुर्मिळ वस्तू सुरक्षित राहते. टवटवीत
राहते. मन कोसळलं की माणूस
कोसळला मन शाबूत ठेवलं की ठेवलं
की आयुष्य पैलथडीला हसत खेळत नेता
येतं. माणूस प्रथम मनान खचतो. तसं
झाल की प्रवाह संथ असतानाही त्यांच्या
होड्या उलटतात.
आपण एवढच फक्त करु शकतो की
आपण आपला शब्द फिरवल्यामुळे
दुसर्‍याची होडी बुडणार नाही ना एवढीचं
काळजी घ्यायची, म्हणजे घेऊ शकतो.
~ वपु । वपूर्वाई
-------------------------------------------------------------------
सुरक्षेची जेवढी मागणी वाढवत न्याल,
तेवढं असुरक्षित वाटत राहतं. मुळातच
आयुष्य असुरक्षित असतं, हे मान्य
करावं. रक्षण कुणापासुन करणार?
कोण करणार? रक्षक ठेवुन कुणाचे प्राण
वाचले आहेत? म्हणुनच अस्तित्वाच्या
हातात सगळं द्यायचं आणि मस्तीत
जगायचं. आपण ठरवलं होतं त्यापैकी
बालपणापासून काय काय घडवू शकलो?
मागून किती आणि न मागता किती
मिळालं, हे फक्त तू तुझ्यापुरतं आठवं.
~ वपु । महोत्सव
-------------------------------------------------------------------
बुध्द सांगतो, संकटात असताना आधार शोधू नका. विघ्न किंवा संकट म्हणजे आयुष्य जगण्यासाठी एक अवसर दिला आहे असं समजा. प्रावासात जर एखादा मोठा दगड वाटे आला तर तिथं थांबू नका. त्या दगडावर उभे रहा आणि स्व:तची उंची वाढवा. आगीतून जायलाच हवं. त्याशिवाय कचरा जळून जात नाही.
~ वपु काळे | महोत्सव
-------------------------------------------------------------------
मिठामुळे पदार्थाला चव येत असली तरी मीठ चवदार नसत. काही माणसे एकटी असतात अन् एकटी असतात तेव्हा बरणीतल्या मिठासारखी खारट असतात. पण ते जेव्हा दुसर्‍याच्या जीवनात मिसळतात तेव्हा त्यांच्या जीवनाची गोडी वाढवतात व आपल्या जीवनाला सार्थकता प्राप्त करून घेतात. 
~ वपु काळे | वपुर्झा.
-------------------------------------------------------------------
एकदा केव्हा तरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाही. जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्यांच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परिस्थितीने दिलेले चटके सोसतानाच पुरेवाट झालेली आहे. कॅलिडोस्कोप पाहीलेला नाही. सर्कस मधला जोकर आता आपलं मन रिझवु शकत नाही, तसचं कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही राहिलेला नाही. कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपला ‘बालपणीचा काळ सुखाचा’ स्वत:बरोबर कधी नेला ते आपल्याला कळलचं नाही. आता त्या ट्रिप्स नाहीत. दोन दोन मुलांच्या जोड्या करून चालणं नाही. विटीदांडू नाही. साबणाचे फुगे नाहीत. प्रवासात बोगदा आला तर अनामिक हुरहुर नाही. त्या उडणार्‍या म्हातारीने हे सगळे आनंद नेले. त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणुनच ती अजुन उडु शकते. आपण जमिनीवरच आहोत. 
  ~ वपु । वपुर्झा
---------------------------------------------------------------------
वैकुंठ, शिक्षण, पदव्या ह्या गोष्टी चिलखतासारख्या वागवायच्या. व्यावहारीक युध्द जिंकण्यासाठी. संसारात मन आणि माणुसकी हेच महत्वाचं. तिथं ही मोठेपणाची चिलखतं कशासाठी? संसाराची व्यवहारिक बाजू डिग्रीवरच चालते.
~ वपु काळे | रंग मनाचे
----------------------------------------------------------------------
"उत्तम आणि उच्च पदवी हीसुद्धा ऎपतच आहे.नुसत स्वाभिमान आहे,पण कोणतीच पात्रता नाही ती माणसं जास्तीत जास्त मग्रुर असतात."
~ वपु काळे । तप्तपदी
-----------------------------------------------------------------
"आयुष्यात जो अत्यंत महत्वाचा निर्णय असतो,की ज्या निर्णयामुळे सगळ्या भवितव्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे,अशा क्षणी कुणावरही विसंबुन रहायचं नाही.आपला बेत फ़सला किंवा कुणीतरी उधळुन लावेल अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नाही.निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहीजे."
~ वपु काळे । तप्तपदी
-----------------------------------------------------------------
प्रेम भक्ती जिथं उगम पावते तिथं संकेत नसतात, असते फक्त उत्कटता! तिथे बंधन नसतं, असते फक्त अमर्यादता. त्यातली दाहकता पचवायला पोलादी छाती लागते. त्यातून जे नंदनवन फूलतं ते पहायला दोन डोऴे पुरत नाही डोळे पाहू शकणार नाहीत असं दाखवणारं निराळे इन्द्रिय लागतं. सामान्यांच्या वाटणीला हे प्रेम यायचं नाही निभावण्याची ताकद असणाऱ्या माणसांचाच तो प्रांत आहे आणि प्रेमाच्या प्रांतात अशी उत्कटतेने उडी घ्याल ,मागचा पुढचा विचार न करताना, धाव घ्याल तेव्हाच तुम्हाला भक्ती म्हणजे काय ते समजेल.. 
~ वपु। इतर
--------------------------------------------------------------------- 
वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते, प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंझ देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा. 
~ वपु। गोष्ट हातात होती
------------------------------------------------------------------
समाजात आपण आपल्याबद्दल जी प्रतिमा उभी केली असेल किंवा आपल्या आणि समाजाच्याही नकळत आपली जी प्रतिमा तयार झाली असेल, ती पुसण्याचं सामर्थ्य पाहिजे. एकांतात, एकाकीपणात, प्रत्येकानं आत डोकावून पाहावं. जाहीरपणे मान्य करण्याच सामर्थ्य नसेल, तर तीही वास्तवता. स्वत:ची स्वत:ला संपूर्ण ओळख असते, कारण माणूस स्वत:पासून पळू शकत नाही.स्वत:च्या सावलीवर जो भाळला, तो फसला.
 ~वपु। आपण सारे अर्जुन
---------------------------------------------------------
एक मांजर सकाळी रस्त्यावर आलं. सूर्याच्या तिरक्या किरणांमुळं मांजराला स्वत:ची लांबपर्यंत पसरलेली सावली दिसली. मांजर म्हणालं,'आज कमीत कमी एखादा घोडा मारून खाल्ल्याशिवाय भूक भागायची नाही.'सूर्य वरवर येऊ लागला.सावलीकडे पाहून मांजर म्हणालं,'घोड्याची काही जरूरी नाही. एखादी शेळी सुद्धा चालेल.'सूर्य आणखी वर आला. सावलीची लांबीही त्याप्रमाणात कमी झाली.मग मांजर म्हणालं,'एखादा ससाही चालेल.'ऐन दुपारी सावली पायांतळीच आली. तेंव्हा मांजर व्याकूळ होत म्हणालं,'फक्त एक उंदराचं पिल्लू पुरे.'
व्याकुळावस्थेत स्वत:ची जी ओळख होते, ती 'वास्तवता'. स्वत:ची ओळख. त्या प्रमाणातच प्रत्येकाची 'पूर्णत्वाची' व्याख्या वेगळी असणार.एखाद्या कलाकृतीत कोणत्याही माणसाला कुठलाही पर्याय किंवा बदल सुचवता येत नाही, तेंव्हा ते 'पूर्णत्व'.
~ वपु। आपण सारे अर्जुन 
---------------------------------------------------------

"एका क्षणामध्ये पत्नीची आई होते, नवऱ्याने त्यानंतर 'पिता' व्हावं ही पत्नीची अपेक्षा असते. पण तस घडत नाही. ह्याच कारण दिवस गेल्यापासुन दिवस पुर्ण होईपर्यंत पत्नीने मातृत्वाचा छोटा कोर्स केलेला असतो. एकच विद्यार्थी असलेला वर्ग तीने नऊ महीने सांभाळलेला असतो. मुल आणि आई, शाळेतच असतात. आणि पुरुष शाळा सोडून अन्यत्र असतो. म्हणुनच त्याला पिता व्हायला वेळ लागतो."
~ वपु काळे | महोत्सव
-------------------------------------------------------------------

स्वतःला काय हवंय ते स्वत:लाच जेव्हा कळत नसतं तीच परिस्थिती खऱ्या परीक्षेची असते... परीक्षा स्वतःच्या स्वभावाची... परीक्षा स्वभावातल्या धीराची... आणि खऱ्या नात्यांची... चंचलता म्हणजे एक धुरकट दु:ख... जे हवंय ते नाही मिळालं कि दु:ख होतंच... पण नक्की 'काय' नाही मिळालंय म्हणून दु:ख होतंय हे माहित नसेल तर त्याहून जास्त दु:ख होतं... कारण दुखणं माहित असेल तर औषध शोधता येतं... जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना 'आपल्या पायाला तळ लागत नाहीये' हि त्याची खंत असते आणि 'पायाला तळ लागला तर श्वास घेता नाही येणार' हि त्याची व्यथा असते... दोन्हीकडे कोंडीच... खरंतर माणूस दु:खालाही सामोरं जायला तयार होतो... पण दु:ख किती आणि कुठपर्यंत सहन करायचं हे माहित नसणं हेच दु:खातलं दु:खाहून मोठं दुखणं... दु:खातही माणसाला स्थैर्य लागतं...

~ वपु काळे | घर हरवलेली माणसं
------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment