गणेश भद्रोत्सव अंगापूर, सातारा

               सर्वांच लक्ष लागून राहिलेला गणेश उत्सवाचा सण जवळच येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा सण मोठया उत्साहाने साजरा केला जातो.  वेगळेपण जपणारा असा असणारा गणेशउत्सव म्हणजे अंगापूरचा "भद्रोत्सव"  महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात सर्वपरिचत आहे.

                साताऱ्याच्या पूर्वेकडे २२किलोमीटर अंतरावर वसलेले व समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंगापूर नगरीत यंदाच्या वर्षी हा भद्रोत्सव दिनांक ५ व ६ सप्टेंबर रोजी साजरा होत आहे.या उत्सवासाठी जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून  हजारो भक्त श्री गणेशाच्या दर्शनासाठी येत असतात. "दोरया म्हणा मोरया, मोरया म्हणा दोरया" च्या जयघोषाने भक्तीभावाने व उत्साहात हा उत्सव संपन्न होत असतो.
              कृष्णा नदीकाठी तीर्थक्षेत्र  अंगापूर वंदन व अंगापूर तर्फ हि दोन गावे आहेत. या गावामध्ये घरोघरी अथवा सार्वजनिक ठिकाणी गणपती बसवला जात नाही. हे उदाहरण कदाचित महाराष्ट्रातील एकमेव असेल मात्र अंगापूर मध्ये गणेश उत्सव "भद्रोत्सव" म्हणून साजरा होतो. दोन दिवस गावामध्ये मोठी यात्रा भरली जाते. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी दोन्ही गावातील सुमारे ८००ते ९०० लहान मुले व तरूण युवक कृष्णा नदीच्या पाण्याने स्नान करून कृष्णेचे पाणी कलशातून घेत लिंबाचीवाडी, बोरगाव, अंगापुर,तासगाव, तांदुळवाडी व पुन्हा अंगापूर असा पायी अंदाजे ७५ ते ८० कि.मीचा पायी प्रवास करत गणेश चतुर्थी दिवशी सायंकाळी ६च्या सुमारास मंदीरात प्रवेश करतात. त्यावेळी नवसाची मुले ओलांडून मंदीराला मोरया म्हणा दोरया च्या जयघोषात प्रदक्षिणा पूर्ण करतात. यावेळी मंदीर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेला असतो व सर्वत्र दोरया म्हणा मोरया, मोरया म्हणा दोरया चा जयघोष दुमदुमत असतो. 
              तदनंतर दुसरया दिवशी भद्रोत्सवाच्या मुख्य धार्मिक कार्यक्रमावेळी मंदीरात मानकरयांच्या हस्ते भगदपात्रात उद,धूप,कापूर,खारीक टाकून तो प्रज्वलित करण्यात येतो, आणिते पेटते भगदपात्र सुवर्णकार समाजातील (दिक्षीत) हे मानकरी डोक्यावर घेत दोन्ही गावातून मंदीरांना प्रदक्षिणा घालण्यास सुरूवात करतात . भगदपात्र मानकऱ्या पाठोपाठ पालखीची मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर भगदपात्र मंदीर परिसरात असणारया दिपमाळेवर ठेवण्यात येते.
               या भद्रोत्सवानिमित्त मंदीर परिसरात मिठाई, फिरते पाळणे,व खेळण्याच्या दुकांनांची मोठी गर्दी असते. तसेच मंदिराला नेत्रदिपक अशी रोषनाई केलेली असते. अशा पद्धतीने अपूर्व उत्साहात व जिल्हयासह राज्याच्या कानाकोपरयातून आलेल्या हजारो गणेश भक्तांच्या मोरया म्हणा दोरया या जयघोषाच्या गर्जनेत भक्तीभावाने व  मोठ्या उत्साहात हा भद्रोत्सव पार पडत असतो.
             यंदाच्या वर्षी हा  भद्रोत्सव दिनांक ५ व ६ सप्टेंबर रोजी पार पडणार असून दिनांक ५ सप्टेंबर रोजी दोरकऱ्यांकडून  नवसाची मुले ओलांडण्यात येतील व दिनांक ६ सप्टेंबर हा भद्रोत्सवाचा मुख्य दिवस असेल, या दिवशी सुवर्णकार समाजातील (दिक्षीत) हे मानकरी पेटते भगद पात्र डोक्यावर घेत दोन्ही गावातून मंदीरांना प्रदक्षिणा घालण्यास सुरूवात करतील.
            वेगळेपण जपणारा हा महाराष्ट्रातील एकमेव असा अंगापूरचा भद्रोत्सव यंदाच्या वर्षी आपण भेट देऊन अवश्य पहा. 

       - सुशांत रा. कणसे
          ९०९६३५३५७५
                 वेगळेपण जपणाऱ्या अंगापूरच्या भद्रोत्सवाची व अंगापूर ची ऐतिहासिक माहिती असलेली चित्रफीत तुम्ही खालील लिंक वर जाऊन आपण पाहू शकता..
#न्यारं_गाव_अंगापूर_वंदन.
By मी मराठी न्यूज चॅनेल
Part 1:
http://youtu.be/8snzzMS9xgw
Part 2 :
http://youtu.be/4jPOzu79-CY
आपलं गाव आपला गणपती, अंगापूर
By झी २४तास न्यूज चॅनेल
http://youtu.be/x6BvgKPIgzg
#आम्ही_अंगापूरकर।फेसबुक पेज
https://www.facebook.com/AamhiAngapurkar/
www.facebook.com/AamhiAngapurkar

No comments:

Post a Comment