शिवजयंती....

१९ फेब्रुवारी ''शिवजयंती''....
   
              खर तर शिवजयंतीचा तिथी आणि तारखेच्या वाद बाजूला ठेवून,  प्रश्न हा आहे कि शिवजयंती कोणतीही असो त्यादिवशी आपण नक्की काय करतो किंवा काय करायचं ठरवतो ?
              तर facebook आणि whats app वरून भरभरून शुभेच्छा देतो. काही यापुढे जाऊन प्लेक्स लावतात, मिरवणुका काढतात, पूजा करतात , DJ लावतात. पण प्रत्यक्ष शिवरायांच्या विचारांचा आदर कोण ठेवतो आणि त्यानुसार वागण्याचा कोण प्रयत्न करतो ?

               शिवरायांनी स्वराज्य निर्माण केल, रयतेला पोटच्या लेकरासारख सांभाळल, जात-भेद मोडीत काढले, अन्यायाला स्वराज्यात थारा दिला नाही. आज आपण काय करीत आहोत ? जय शिवराय बोलून, गाड्यांवर stickers लावणे, पिळदार दाढी-मिश्या ठेऊन कपाळी गंध लावणे म्हणजे आपण शिवकार्य करतोय का ? हे करण्यात काही गैर नसावं, पण आपण शिवरायांच्या विचारांच अनुकरण करत आहोत का ? खरंच काही समाज उपयोगी कार्य करत आहोत का ? आज आपण पाहतो आपल्या आजूबाजूला कितीतरी असे लोक आहेत ज्यांना मदतीची गरज आहे, लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी, अपंगांसाठी काम करणाऱ्या संस्था आहेत, पण आपण त्याकडे किती लक्ष देतो ? खूप कमी लोक आणि संस्था ज्या प्रत्यक्ष गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचे, गरजू व्यक्तींना वेळोवेळी मदतीचा हात देण्याचे काम करतात. अशा सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थाच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करतात अस मला तरी वाटत. ​आपण निदान वर्षातल्या या दिवशी तरी अशा सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकतो, नाही का ??
पटलं तर ठरवाल ना मग ??
                   - सुशांत कणसे

No comments:

Post a Comment