कुणाचेच नसतात हक्क कुणावर पण,
तरीही डोळे भरतातच ना ?
मुळात अपेक्षाच करु नये अशा पण,
तरीही आस लागतेच ना ?
हिशोब मांडला सारा तर आकडेही पडतील कमी,
तरीही सुख मोजताना पापण्या भिजतातच ना ?
लाख झाला असेल मनाचा दगड,
तरीही आठवणींनी त्याला पाझर फुटतोच ना ?
जोडलेली नाती तुटताना मनात वेदना होतातच ना ?
या सगळ्यातनं हाती उरायचे असते शून्य,
तरीही जीव जडतातच ना ??
No comments:
Post a Comment