शिवजयंती....

१९ फेब्रुवारी ''शिवजयंती''....
   
              खर तर शिवजयंतीचा तिथी आणि तारखेच्या वाद बाजूला ठेवून,  प्रश्न हा आहे कि शिवजयंती कोणतीही असो त्यादिवशी आपण नक्की काय करतो किंवा काय करायचं ठरवतो ?
              तर facebook आणि whats app वरून भरभरून शुभेच्छा देतो. काही यापुढे जाऊन प्लेक्स लावतात, मिरवणुका काढतात, पूजा करतात , DJ लावतात. पण प्रत्यक्ष शिवरायांच्या विचारांचा आदर कोण ठेवतो आणि त्यानुसार वागण्याचा कोण प्रयत्न करतो ?

कुणीच नसतं.....

कुणाचेच नसतात हक्क कुणावर पण,
तरीही डोळे भरतातच ना ?
मुळात अपेक्षाच करु नये अशा पण,
तरीही आस लागतेच ना ?
हिशोब मांडला सारा तर आकडेही पडतील कमी,
तरीही सुख मोजताना पापण्या भिजतातच ना ?
लाख झाला असेल मनाचा दगड,
तरीही आठवणींनी त्याला पाझर फुटतोच ना ?
जोडलेली नाती तुटताना मनात वेदना होतातच ना ?
या सगळ्यातनं हाती उरायचे असते शून्य,
तरीही जीव जडतातच ना ??