"प्रजा"सत्ताक…

"प्रजा"सत्ताक…
२६ जानेवारी १९५०
            रोजी भारत प्रजासत्ताक झाला म्हणजेच ,
या दिवशी भारतीय सत्ता राजाकडून प्रजेकडे आली. भारत लोकशाहीप्रधान देश झाला. या आधी देशाचे राज्यकर्ते या देशाचे राजे होते व या दिवसा पासून ते या देशाचे सेवक झाले. अन् खरया अर्थाने भारत प्रजेची सत्ता असणारा देश बनला.…
  
                पण आज खरच भारत प्रजासत्ताक आहे?                  
जिथे आज भ्रष्ट नेत्यांचे घोटाळे उघड होऊन सुद्धा ते पुन्हा निवडून येतात,
मेरीट लिस्ट मध्ये येऊन सुद्धा जिथे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही,
मेहनती तरुणांना वशिला नाही म्हणून नोकरी मिळत नाही,
सरकारी अनुदान मान्य होते पण ते शेतकरयांपर्यंत पोहचत नाही आणि म्हणून शेतकरी कर्जमुक्त होण्यासाठी आत्महत्येचा सोपा मार्ग निवडतात,
जिथे एखादा भ्रष्ट नेता जेलमधून बाहेर आल्यावर जल्लोष साजरा केला जातो अन तो भ्रष्ट असूनही कारवायी होत नाही .
देशद्रोह्यांना जेल होत नाही झाली तरी कोटींच्या सुख सुविधा पुरविल्या जातात.
सामान्य जनतेला न्याय सुरक्षा भेटत नाही, अन गुंडगिरी,अवैध धंदे करनारे जिथ सुखी चैन करतात .
जिथ प्रजासत्ताक दिनी आणि स्वातंत्र्य दिनी अभिमानाने छातीवर तिरंगा मिरवणारे आनंदी अन त्या तिरंग्याच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांचे कुटुंब मदतीसाठी उपेक्षित असत.
कसा तो आमचा प्रजासत्ताक अन् स्वातंत्र्य देश ??
           सामान्यांचा कांद्याने वांदा होतोय, पेट्रोलचे दर काही स्वस्त होत नाहीत. गुंडांचा बाजार होतोय अबलांचे जगण मुश्कील होत चाललय. बलात्कार वाढतायत, शेतकरी मरतायत, कलेक्टर जळतायत. टि.व्ही.वर नुस्ती चर्चा करतायत. शिवाजी, संभाजी, आंबेडकर, सावरकर नावे आता पक्षीय प्रायव्हेट प्राँपर्टी होत चाललिय.

जगण्यापेक्षा इथ झालय मरणच स्वस्त,
कुंपणच करतय आता शेत सारं फस्त.
तरीही आम्ही अभिमानाने फक्त शुभेच्छाच देतोय. अन्यायाविरुद्ध शांत बसण्याएवढे नाकर्ते आम्ही का झालोय ??
            
                              -सुशांत रा. कणसे

No comments:

Post a Comment