धर्मवीर…

1 फेब्रुवारी…
               1 फेब्रुवारी 1689 मराठ्यांच्या इतिहासातील एक काळा दिवस. मराठ्यांचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज मुघलांनी संगमेश्वरात कैद केले तो दिवस...
                1689 मध्ये राजे विशाळगडाकडून रायगडाकडे जाताना संमगमेश्वरात सरदेसाईंच्या वाड्यावर थांबले असताना. औरंगजेबाला संभाजी राजे संगमेश्वरला असल्याची खबर लागली. खबर लागताच औरंगजेबाने स्वतःचा मुलगा व मुकर्रब खान यांची रवानगी संभाजीराजांना कैद
करण्यासाठी केली. अचानक हल्ला झाला. सरदेसाई यांच्या वाडयातून संभाजी राजे बाहेर पडले. सोबत होते सरसेनापती मालोजी घोरपडे. पण मुकर्रब खानशी लढता-लढता मालोजी घोरपडे धारातीर्थी पडले. फितुरीने झालेला दगा
यामुळे मुकर्रब खानाची सरसी झाली. छत्रपती संभाजी महाराज चपळाईने घोडयावर स्वार झाले. वेगाने घोडा सोडला. तेवढयात कवि कलेशाचा आवाज आला.

पुरोगामी महाराष्ट्र…

जे लोक इतक्या वर्षांपासून हिंदूंना देव दाखवून बक्षीस घेण्याचे आव्हान देत होते. तेच आज देवाच्या चौथऱ्यावर जाण्यासाठी "लढा" देत आहेत.
माझ्या माहितीप्रमाणे शनी मंदिरातील चौथऱ्यावर गेल्या ३-४ वर्षांपासून पुरुषांना सुध्दा बंदी आहे. तेल एका डब्यात जमा करून तो डबा तेथील पुजारीच शनी महाराजांवर अर्पण करतात.
महिलांना पहिल्यापासूनच तेथे प्रवेशास बंदी आहे. पण, आता तर कोणालाच प्रेवश नाही.
चला मान्य केले कि, नास्तिकांना कोणता तरी फार मोठा बांबू लागला असणार. त्याशिवाय हे  आस्तिक होऊन देवाची पूजा करायला निघाले नसणार.
पण, कोणत्या देवाची पूजा???

"प्रजा"सत्ताक…

"प्रजा"सत्ताक…
२६ जानेवारी १९५०
            रोजी भारत प्रजासत्ताक झाला म्हणजेच ,
या दिवशी भारतीय सत्ता राजाकडून प्रजेकडे आली. भारत लोकशाहीप्रधान देश झाला. या आधी देशाचे राज्यकर्ते या देशाचे राजे होते व या दिवसा पासून ते या देशाचे सेवक झाले. अन् खरया अर्थाने भारत प्रजेची सत्ता असणारा देश बनला.…
  
                पण आज खरच भारत प्रजासत्ताक आहे?                  
जिथे आज भ्रष्ट नेत्यांचे घोटाळे उघड होऊन सुद्धा ते पुन्हा निवडून येतात,
मेरीट लिस्ट मध्ये येऊन सुद्धा जिथे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही,
मेहनती तरुणांना वशिला नाही म्हणून नोकरी मिळत नाही,
सरकारी अनुदान मान्य होते पण ते शेतकरयांपर्यंत पोहचत नाही आणि म्हणून शेतकरी कर्जमुक्त होण्यासाठी आत्महत्येचा सोपा मार्ग निवडतात,
जिथे एखादा भ्रष्ट नेता जेलमधून बाहेर आल्यावर जल्लोष साजरा केला जातो अन तो भ्रष्ट असूनही कारवायी होत नाही .
देशद्रोह्यांना जेल होत नाही झाली तरी कोटींच्या सुख सुविधा पुरविल्या जातात.
सामान्य जनतेला न्याय सुरक्षा भेटत नाही, अन गुंडगिरी,अवैध धंदे करनारे जिथ सुखी चैन करतात .
जिथ प्रजासत्ताक दिनी आणि स्वातंत्र्य दिनी अभिमानाने छातीवर तिरंगा मिरवणारे आनंदी अन त्या तिरंग्याच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांचे कुटुंब मदतीसाठी उपेक्षित असत.
कसा तो आमचा प्रजासत्ताक अन् स्वातंत्र्य देश ??
           सामान्यांचा कांद्याने वांदा होतोय, पेट्रोलचे दर काही स्वस्त होत नाहीत. गुंडांचा बाजार होतोय अबलांचे जगण मुश्कील होत चाललय. बलात्कार वाढतायत, शेतकरी मरतायत, कलेक्टर जळतायत. टि.व्ही.वर नुस्ती चर्चा करतायत. शिवाजी, संभाजी, आंबेडकर, सावरकर नावे आता पक्षीय प्रायव्हेट प्राँपर्टी होत चाललिय.

जगण्यापेक्षा इथ झालय मरणच स्वस्त,
कुंपणच करतय आता शेत सारं फस्त.
तरीही आम्ही अभिमानाने फक्त शुभेच्छाच देतोय. अन्यायाविरुद्ध शांत बसण्याएवढे नाकर्ते आम्ही का झालोय ??
            
                              -सुशांत रा. कणसे

नटसम्राट संवाद (डायलॉग)…


To be or not to be that is the question…
To be or not to be that is the question जगाव की मराव हा एकच सवाल आहे. ह्या दुनियेच्या ऊकिरड्यावर खरकट्या
पत्रावळीचा तुकडा होऊन जगाव बेशरम लाचार आनंदान ?
का फेकुन द्याव देहाच लखतर मृत्यूच्या काळाशार डोहामध्ये?
आणि करावा शेवट सर्वांचा एकाच प्रहाराने?
माझा तुझा ह्याचा अन त्याचाही.
मृत्युच्या महासर्पाने जीवनाला असा डंख मारावा…
की नंतर येणा-या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही..
पण मग..
पण मग त्या
निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडु लागलं तर….? तर…तर…
इथेच मेख आहे.नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा
धीर होत नाही म्हणुन आम्ही सहन करतो जुन
जागेपण..
सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने
अभिमानावर होणारे बलात्कार…
अस्तित्वाच्या गाभा-यात असणा-या सत्वाची विटंबना..
आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेन आमच्याच मारेक-
यांच्या दाराशी.
विधात्या.. तु इतका कठोर का झालास?
एका बाजुला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुस-या बाजुला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तु हीआम्हाला विसरतोस.
पण मग विस्कटलेल्या हाडांचे
हे सापळे घेऊन हे करुणाकरा…
आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायावर डोक आदळायच? कोणाच्या पायावर ?
कोणाच्या ? कोणाच्या???



कुणी घर देता का घर ?
कुणी घर देता का घर ?
एका तुफानाला कुणी घर देता का ?
एक तुफान भिंतीवाचून, छपरावाचून, माणसाच्या
मायेवाचून, देवाच्या दयेवाचून जंगलाजंगलात हिंडतय.
जिथून  कुणी उठवणार नाही अशी एक जागा धुंडतय.
कुणी घर देता का घर ?
रागावयचे नाही…
रागावयचे नाही…
रागावून काय फायदा आहे आणि रडणारसुद्धा नाही.
माझ्या डोळ्यात आसवं जमा व्हायला लागले ना मग खिळे मारून खाचा करून टाकीन,
पण या आगीसमोर रडणार नाही.


नटसम्राट मधील अप्पा आणि कावेरीचा खुप प्रेमळ आणि भावस्पर्शी संवाद....

अप्पा — कावेरी, गेल्या पन्नाससाठ वर्षात एक
गोष्ट तुला सांगायची मी विसरुन गेलो, आता सांगणार आहे ती .
कावेरी — कोणती ती?
अप्पा — तू मला फार आवडतेस. मी खूप खूप प्रेम करतो तुझ्यावर.
कावेरी — इश्श! या गोष्टी बोलायच्या असतात का ?
आणि हे काय मला माहीत नव्हतं ?
अप्पा — तरीही एकदा सांगावंसं वाटतं.
कावेरी — एक विचारु का ? रागवायचं नाही हं.
अप्पा — विचार.
कावेरी — मला सवती किती होत्या!
अप्पा — बापरे! आठवणीच्या मावळतीवर हे जुने जमाखर्च आता कसे लक्षात येणार? पण तुला एक सांगतो,
कावेरी, तुला सवत कुणीही नव्हती. होत्या त्या फक्त माझ्या मैत्रिणी होत्या.
कावेरी — मी मैत्रिण नव्हते ?
अप्पा — तू बायको होतीस.
कावेरी — बायको मैत्रिण असू शकत नाही ?
अप्पा — असू शकते, असतेही; पण मैत्रिणीपेक्षा आई अधिक असते.

दिवाणखाना कमी असतो,
पण देऊळ जास्त असते.
आकाश कमी असते,
पण पृथ्वी अधिक असते.

थोडक्यात, बायको हे एक बंदर असतं कावेरी,
नवरा नावाच्या गलबतासाठी.
गलबत शिडं उभारुन सातासमुद्रात मुशाफरी
करायला बाहेर पडतं.
हे समुद्र असतात व्यवहाराचे, कलेचे, ध्येयाचे,
प्रेमाचे आणि द्वेषाचेही. या दर्यात शिरावं,
दूरवरचे किनारे पाहावे, वादळवा-याशी
मुकाबला करावा, चंद्रचांदण्यांशी सोयरीक
करावी. संतप्त लाटांची मस्ती अंगावर घ्यावी.
जगणं असं असावं की पावला-पावलांवर
मरणाशी मुलाखत व्हावी.
परंतु हे सारे उद्रेक अंगावर घेताना गलबत
सतत पाहात असतं आपल्या बंदराकडे.
पराभवाच्या जखमा किंवा विजयाचे झेंडे
घेऊन ते पुन्हा बंदरात येतं आणि तेथील
हिरव्या निळ्या प्रकाशात, प्रशान्त पाण्याच्या
गालिच्यावर विश्रांत होतं.

गलबताच्या पराक्रमाचा उदय बंदरात होतो,
पराजयाचे सांत्वनही त्याला बंदरातच मिळतं...

अशी आहे बंदराची महती....
म्हणजे बायकोची!!!!