दुःख हे माझे..

दुः ख  हे माझे ऐकले,
मी एकट्याने भोगले .
गत काळाच्या आठवणी ,
नयन माझे आश्रुने माखले .


वपु एक विचार..!!


रसिकप्रांतात व.पु.काळे माहीत नाहीत असा रसिक शोधुन सापडणार नाही. हा "वपु एक विचार " संग्रह सगळ्याच रसिकांसाठी आहे. ज्यांना व.पु. माहीती आहेत, आवडतात त्यांच्यासाठी. आणी ज्यांना माहीती नाही अशांसाठी सुद्धा. खात्री आहे तुम्हा वाचकांना हे वाचून नक्कीच आनंद होईल !

-------------------------------------------------
वपुं काळेंची काही निवडक पुस्तके..

 

सगळी उत्तरं आपल्याजवळच असतात. समस्या आपली आणि त्याचं उत्तरं मात्र इतरत्र असे घडत नाही. उत्तराची मागची बाजू म्हणजे समस्या. आपण फक्त आपली बघण्याची दिशा बदलायची. स्वतःकडेच नीट पाहायचं. 'पिंडी ते ब्रह्मांडी' असं म्हणतात ते सत्य आहे.
~ वपु काळे | मायाबाजार
-------------------------------------------------------------------
"आयुष्यात जो अत्यंत महत्वाचा निर्णय असतो,की ज्या निर्णयामुळे सगळ्या भवितव्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे,अशा क्षणी कुणावरही विसंबुन रहायचं नाही.आपला बेत फ़सला किंवा कुणीतरी उधळुन लावेल अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नाही.निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहीजे."
  ~ वपु काळे | तप्तपदी
-------------------------------------------------------------------"लग्नासारखा एक निर्णय आबाद किंवा बरबाद करायला पुरेसा असतो.अशा वेळी व्यक्ती स्वतंत्र हवी."
  ~ वपु काळे | तप्तपदी
-------------------------------------------------------------------
माणसं चंद्रासारखी शीतल का होत नाहीत? एकच कारण.
ती चंद्राची उपेक्षा करतात. रात्री झोपा काढतात. एका चतुर्थीत सगळं देणं चुकवतात. त्यातही भक्ती किती? आणी अहंकार किती?
उपवास करणार्‍यांचा परिवारावर एक अनामिक पगडा असतो. दडपण असतं. चंद्राची शीतलता उचलणं हेच व्रत. त्याच्या शीतलतेचं अनुकरण केलं तर घरात चांदणं पहुडेल.
पण त्या शीतलतेशी घनिष्ठ मैत्री हवी. ती झोपून कशी मिळणार?
त्यासाठी हे असं चांदण्यांशी संधान जुळवलं पाहिजे.
समुद्रासारखा जीवही चंद्र दिसला की झेपावतो. मिठाला जागतो. मग माणसं अशी थंड का? ती शांत असतील तर उत्तम. पण ती थंड म्हणजे निर्विकार असतात.
~ वपु काळे | सखी
-------------------------------------------------------------------

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार- यशवंतराव चव्हाण


जन्म- १२ मार्च १९१३
मृत्यु- २५ नोव्हेंबर १९८४

                    मा. यशवंतराव चव्हाण हा मराठी मनांचा मानबिंदू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारा, महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारा आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला त्याच्या लोकशाही ताकदीचे भान देणारा हा द्रष्टा नेता. जनसामान्यांच्या गळ्यातील ताईत होता, माझा सारख्यांचा आजही तो आदर्श आहे.