जीवन हे मोजकच असतं ,
ते रडत कधी जगायच नसतं .
सुख दुःखाने आयुष्य घडत असतं ,
आपल्या दुःखाने कधी रडायच नसतं .
संकटांना तोंड दयायच असतं ,
पाठ फिरवून कधी घाबरायच नसतं .
कधी काही हरवतं तर कधी काही सापडतं ,
पण हरवल्याच दुःख कधी बाळगायच नसतं .
दुसरयासाठी आपणही थोड सुख विसरायच असतं ,
कारण आपल्याला हवं ते सगळं आपल्याला मिळत नसतं .
जीवन हे एकदाच जगायचं असतं ,
मरणानंतरही आपलं नाव इतरांना विसरु दयायच नसतं .
आपल जीवन आपणच घडवायच असतं ,
फुलासंगे फुलायचं की मातीसंगे मिसळायचं ते आपणच ठरवायच असतं .
- Sushant_R._Kanase
No comments:
Post a Comment