गरीब-श्रीमंत


गरीबाला आपल्या भोकं पडलेल्या
जुन्या कपडयांची लाज वाटत असते ,
श्रीमंतांना आपल्या नवीन कपड्यांना
भोक पाडून ते परिधान करण्यात मजा वाटत असते...

एकीकडे गरीबाला कपड्याने आपले
अंग पूर्णपणे झाकायचे असते ,
श्रीमंताला मात्र त्यात समाजात
कमीत कमी कपड्यात वावरायचे असते...

गरीबाला फक्त आपल्या शरीरातील
पोटाची खळगी भरण्याची काळजी असते ,
श्रीमंताला आपले शरीर सतत तरूण- तजेलदार
कसे दिसेल याचीच काळजी वाटत असते...

एकीकडे गरीबाची चामडी
उन्हा-तान्हात काम करून काळी पडत असते ,
श्रीमंताने तेच उन न खाल्ल्यामुळे
त्याची चामडी पांढरी पडत असते...

गरीबाने शरीराचे चोचले
न पुरविल्यामुळेच त्याचे जीवन संपत असते ,
श्रीमंताने शरीराचे चोचले
अधिक पुरविल्यामुळे त्याचे जीवन संपत असते...

जीवन

                जीवन हे मोजकच असतं ,
                ते रडत कधी जगायच नसतं .

सुख दुःखाने आयुष्य घडत असतं ,
आपल्या दुःखाने कधी रडायच नसतं .

               संकटांना तोंड दयायच असतं ,
               पाठ फिरवून कधी घाबरायच नसतं .

कधी काही हरवतं तर कधी काही सापडतं ,
पण हरवल्याच दुःख कधी बाळगायच नसतं .
      
             दुसरयासाठी आपणही थोड सुख विसरायच असतं ,
             कारण आपल्याला हवं ते सगळं आपल्याला मिळत नसतं .

जीवन हे एकदाच जगायचं असतं ,
मरणानंतरही आपलं नाव इतरांना विसरु दयायच नसतं .

            आपल जीवन आपणच घडवायच असतं ,
            फुलासंगे फुलायचं की मातीसंगे मिसळायचं ते आपणच ठरवायच असतं .
                          - Sushant_R._Kanase