शब्द्…

शब्दांनी शिकवलय पडता पडता सावरायला,
शब्दांनी शिकवलय रडता रडता हसायला,
शब्दांमुऴे होतो एखाद्याचा घात आणि
शब्दांमुऴे मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ,
शब्दांमुऴे जुऴतात मनामनाच्या तारा आणि
शब्दांमुऴे चढतो एखाद्याचा पारा,
शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी ,
आणि शब्दांमुऴेच तरऴते कधितरी डोऴ्यात पाणी...

"म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल"

स्वामी विवेकानंदाच्या स्वप्नातील युवक असा असावा…

चेहेऱ्यावर तेज आहे
देहामध्ये शक्ती आहे
मनामध्ये उत्साह आहे
बुद्धीमध्ये विवेक आहे
हृदयामध्ये करुणा आहे
मातृभूमीवर प्रेम आहे
इंद्रियांवर संयम आहे
मन ज्याचे स्थिर आहे
आत्मविश्वास दृढ आहे
इच्छाशक्ती प्रबळ आहे
धाडसाचे बळ  आहे
सिंहासारखा निर्भय आहे
ध्येय ज्याचे उच्च आहे
सत्य ज्याचा ईश्वर आहे
व्यसनांपासून मुक्त आहे
जीवनामध्ये शिस्त आहे
प्रेमळ ज्याचा सूर आहे
मानवता हेच कुळ आहे
गुरुजनांचा आदर आहे
पालाकांवरती श्रद्धा आहे
दीन-दुबळ्यांचा मित्र आहे
सेवेसाठी तत्पर आहे
देवावारती भक्ती आहे
जीवनामध्ये नीती आहे
चारित्र्य ज्याचे शुद्ध आहे
तोच आदर्श युवक आहे…

" ती "

मी जिच्यावर प्रेम केलं
तिचं शरीर कधी दिसलंच नाही
त्यामुळे शरीराची आसक्ती
मनात कधी उफाळलीच नाही……
       मी फक्त नकळत गुंतत गेलो
       तिच्या टप्पोऱ्या सुंदर डोळ्यांवर
       तिच्या लांबसडक कुरळ्या केसांवर
       कधी घातलेल्या मोहक अंबाड्यावर
       तिच्या मधुर हसण्यावर
       न हसण्यामुळे खूप गोड दिसण्यावर ……
मी फक्त प्रेम करतं गेलो
तिच्या निरागस असण्यावर
न भेटलल्या निष्पाप भावनांवर
तिच्या माझ्यावरच्या विश्वासावर
माझ्या निरागस स्पर्शाच्या तिच्या जाणीवेवर
हातात हात देऊन स्तब्ध बसण्यावर
अन वेडा आहेस तू या बोलण्यावर ……
         मी फक्त वेडा होत गेलो
         मी अबोल होताच तिच्या साद घालण्यावर
         माझ्या वेदनांवर फुंकर मारतांना मी गप्पं         बसण्यावर
         माझ्या प्रेमाला तिच्या मनानं समजून                  घेण्यावर
         माझ्या आठवणीत व्याकूळ झालेल्या तिच्या नजरेवर
         तिच्या दगडांपेक्षाही पाषाण मनावर
         अन तितक्याच सुंदर हृदयावर
माझी नजर फक्त
तिचं मन , हृदय , अन आत्म्याकडे होती
माझ्या प्रीतीला वासनेची किनारही नव्हती
म्हणून तर तिचं शरीर
मला कधी दिसलंच नाही
अन माझं प्रेम पाहून ती केव्हा गुंतली
हे तिलाही कळलं नाही
      हा प्रीत गंधच तर मनांना गुंतवून ठेवतो
      अन तिच्या आठवणीत मी बेधुद जगत राहतो
      जे मला हव होतं ते प्रेम मला मिळालंय
     आता कुठलीही आस नाही खंर प्रेम मला  कळलंय .
        -sushant r. kanase

जाणीव


जाणीव
कुणाला जाणीव ही नसते ,
कुणासाठी कुणीतरी झुरते.
कळीला त्रास होऊ नये म्हणून ,
एक फुलपाखरू बागेबाहेरच फिरते .
किती त्रास
द्यावा एखाद्याला ,
यालाही काही प्रमाण असते .
आपल्यावरूनच विचार करावा,
समोरच्यालाही मन असते ...