नटसम्राट संवाद (डायलॉग)…


To be or not to be that is the question…
To be or not to be that is the question जगाव की मराव हा एकच सवाल आहे. ह्या दुनियेच्या ऊकिरड्यावर खरकट्या
पत्रावळीचा तुकडा होऊन जगाव बेशरम लाचार आनंदान ?
का फेकुन द्याव देहाच लखतर मृत्यूच्या काळाशार डोहामध्ये?
आणि करावा शेवट सर्वांचा एकाच प्रहाराने?
माझा तुझा ह्याचा अन त्याचाही.
मृत्युच्या महासर्पाने जीवनाला असा डंख मारावा…
की नंतर येणा-या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही..
पण मग..
पण मग त्या
निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडु लागलं तर….? तर…तर…
इथेच मेख आहे.नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा
धीर होत नाही म्हणुन आम्ही सहन करतो जुन
जागेपण..
सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने
अभिमानावर होणारे बलात्कार…
अस्तित्वाच्या गाभा-यात असणा-या सत्वाची विटंबना..
आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेन आमच्याच मारेक-
यांच्या दाराशी.
विधात्या.. तु इतका कठोर का झालास?
एका बाजुला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुस-या बाजुला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तु हीआम्हाला विसरतोस.
पण मग विस्कटलेल्या हाडांचे
हे सापळे घेऊन हे करुणाकरा…
आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायावर डोक आदळायच? कोणाच्या पायावर ?
कोणाच्या ? कोणाच्या???



कुणी घर देता का घर ?
कुणी घर देता का घर ?
एका तुफानाला कुणी घर देता का ?
एक तुफान भिंतीवाचून, छपरावाचून, माणसाच्या
मायेवाचून, देवाच्या दयेवाचून जंगलाजंगलात हिंडतय.
जिथून  कुणी उठवणार नाही अशी एक जागा धुंडतय.
कुणी घर देता का घर ?
रागावयचे नाही…
रागावयचे नाही…
रागावून काय फायदा आहे आणि रडणारसुद्धा नाही.
माझ्या डोळ्यात आसवं जमा व्हायला लागले ना मग खिळे मारून खाचा करून टाकीन,
पण या आगीसमोर रडणार नाही.


नटसम्राट मधील अप्पा आणि कावेरीचा खुप प्रेमळ आणि भावस्पर्शी संवाद....

अप्पा — कावेरी, गेल्या पन्नाससाठ वर्षात एक
गोष्ट तुला सांगायची मी विसरुन गेलो, आता सांगणार आहे ती .
कावेरी — कोणती ती?
अप्पा — तू मला फार आवडतेस. मी खूप खूप प्रेम करतो तुझ्यावर.
कावेरी — इश्श! या गोष्टी बोलायच्या असतात का ?
आणि हे काय मला माहीत नव्हतं ?
अप्पा — तरीही एकदा सांगावंसं वाटतं.
कावेरी — एक विचारु का ? रागवायचं नाही हं.
अप्पा — विचार.
कावेरी — मला सवती किती होत्या!
अप्पा — बापरे! आठवणीच्या मावळतीवर हे जुने जमाखर्च आता कसे लक्षात येणार? पण तुला एक सांगतो,
कावेरी, तुला सवत कुणीही नव्हती. होत्या त्या फक्त माझ्या मैत्रिणी होत्या.
कावेरी — मी मैत्रिण नव्हते ?
अप्पा — तू बायको होतीस.
कावेरी — बायको मैत्रिण असू शकत नाही ?
अप्पा — असू शकते, असतेही; पण मैत्रिणीपेक्षा आई अधिक असते.

दिवाणखाना कमी असतो,
पण देऊळ जास्त असते.
आकाश कमी असते,
पण पृथ्वी अधिक असते.

थोडक्यात, बायको हे एक बंदर असतं कावेरी,
नवरा नावाच्या गलबतासाठी.
गलबत शिडं उभारुन सातासमुद्रात मुशाफरी
करायला बाहेर पडतं.
हे समुद्र असतात व्यवहाराचे, कलेचे, ध्येयाचे,
प्रेमाचे आणि द्वेषाचेही. या दर्यात शिरावं,
दूरवरचे किनारे पाहावे, वादळवा-याशी
मुकाबला करावा, चंद्रचांदण्यांशी सोयरीक
करावी. संतप्त लाटांची मस्ती अंगावर घ्यावी.
जगणं असं असावं की पावला-पावलांवर
मरणाशी मुलाखत व्हावी.
परंतु हे सारे उद्रेक अंगावर घेताना गलबत
सतत पाहात असतं आपल्या बंदराकडे.
पराभवाच्या जखमा किंवा विजयाचे झेंडे
घेऊन ते पुन्हा बंदरात येतं आणि तेथील
हिरव्या निळ्या प्रकाशात, प्रशान्त पाण्याच्या
गालिच्यावर विश्रांत होतं.

गलबताच्या पराक्रमाचा उदय बंदरात होतो,
पराजयाचे सांत्वनही त्याला बंदरातच मिळतं...

अशी आहे बंदराची महती....
म्हणजे बायकोची!!!!

जगणं…

धाव धाव धावतो आहे,
दिशा मात्र कळत नाही.
ह्रदयाचे पाऊल कधी,
ह्रदयाकडे वळत नाही.
इतकं जगून झालं पण,
जगायला वेळ नाही.
जगतो आहोत कशासाठी,
कशालाच कशाचा मेळ नाही.
क्षण एक येईल असा,
घेऊन जाईल हा श्वास.
अर्ध्यावरच थांबलेला,
असेल जीवन प्रवास.
अजूनही वेळ आहे,
थोडं तरी जगून घ्या.
सुंदर अशा जगण्याला,
डोळे भरून बघून घ्या.
                    

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे…

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय          बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन  त्यांच्यबद्दल  थोडसं…
           शिवसेना... झिंदाबाद !
       हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय          बाळासाहेब ठाकरे यांचा... विजय असो !!
आवाज कुणाचा...शिवसेनेचा !!!
अशा गर्जनांनी अवघा महाराष्ट्र दणाणत होता. साठच्या दशकात बाळ केशव ठाकरे नावाचं चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आदळले. त्याच्या तडाख्याने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. एवढ्याने न थांबून पुढे हे वादळ दिल्लीवर जाऊन धडकले, भारताच्या विरोधी राष्ट्रांवरही त्याची कंपने जाणवू लागली.

            समाज प्रबोधनाचा वारसा आपल्या वडिलांकडून लाभलेल्या बाळ ठाकरे यांनी १९६० साली मार्मिक ह्या साप्ताहिकामधून समाजातील व्यंगावर आपल्या कुंचल्याद्वारे ठाकरी आसूड ओढण्यास सुरुवात केली. एवढ्यानेच ते थांबले नाहीत, तर महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी १९६६ मध्ये शिवसेना ही संघटना स्थापन केली. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज्यांवर दृढ श्रद्धा असणाऱ्या ठाकरेंनी निवडलं मराठी साम्राज्याचं निशाण, "जरी पटका" आणि संघटनेचे प्रतिक ढाण्या वाघ. अतिशय तेजस्वी चर्या आणि प्रभावी वक्तृत्वाने त्यांनी लोकांच्या मनावर गरुड केलं. आणि मग बाळ ठाकरेंचे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कधी झाले हे समजलंदेखील नाही. दक्षिण आणि मध्य मुंबईतल्या समस्त तरुणवर्गाचे मन बाळासाहेबांनी कधीच जिंकले होते. सुरुवातीला कम्युनिस्टांची दादागिरी मोडून काढून त्यांनी ह्या विभागात भगवा फडकवला. दक्षिणात्य लोकांचे अधिपत्य असलेल्या नोकऱ्यांमध्ये मराठ्यांना प्राधान्य मिळून देण्यासाठी त्यावेळी त्यांनी "लुंगी हटाव, पुंगी बजाव" आंदोलन छेडले. शिवसेनेचा ढाण्या वाघ महाराष्ट्रभर डरकाळ्या फोडीत हिंडू लागला.

                बाळासाहेब हे अतिशय परखड होते. त्यांना जे योग्य वाटलं, तेच त्यांनी केलं. त्यासाठी ते कोणत्याही टीकेला सामोरे जात असत. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींना पाठिंबा देणाऱ्या बाळासाहेबांनी, हिंदूराष्ट्र स्थापन करण्यासाठी भाजप बरोबर युती केली. बाळासाहेब हे राजकारणापलीकडले होते. अनेक जातीधर्मांच्या विविध क्षेत्रातल्या लोकांशी त्यांनी दिलखुलास मैत्री केली. राजकारण आणि मैत्री यात त्यांनी कधीही गल्लत केली नाही आणि म्हणूनच त्यांचे कित्तेक राजकीय विरोधक हे मित्र बनले.

                 राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये जास्त रस असल्यामुळेच, बाळासाहेबांना अतुलनीय लोकप्रियता लाभली. अशा ह्या व्यक्तीबद्दल मी काय बोलणार. पण इतकच सांगतो की असा बहुआयामी आणि प्रचंड लोकप्रिय नेता परत पाहायला मिळणे कठीण. आज ते आपल्यात नाहीत. जन्माला आलेल्या प्रत्येकाचा शेवट हा कधी न कधी होणारच. त्यांना माझा अखेरचा जय महाराष्ट्र !!

ऐसा नेता कधी न झाला ,
अन् पुन्हा कधी न होणार…
बाळासाहेब ठाकरे नाव अमर राहणार…

त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन…
जय हिंद…!!
जय महाराष्ट्र… !!!

              -Sushant R. Kanase

गरीब-श्रीमंत


गरीबाला आपल्या भोकं पडलेल्या
जुन्या कपडयांची लाज वाटत असते ,
श्रीमंतांना आपल्या नवीन कपड्यांना
भोक पाडून ते परिधान करण्यात मजा वाटत असते...

एकीकडे गरीबाला कपड्याने आपले
अंग पूर्णपणे झाकायचे असते ,
श्रीमंताला मात्र त्यात समाजात
कमीत कमी कपड्यात वावरायचे असते...

गरीबाला फक्त आपल्या शरीरातील
पोटाची खळगी भरण्याची काळजी असते ,
श्रीमंताला आपले शरीर सतत तरूण- तजेलदार
कसे दिसेल याचीच काळजी वाटत असते...

एकीकडे गरीबाची चामडी
उन्हा-तान्हात काम करून काळी पडत असते ,
श्रीमंताने तेच उन न खाल्ल्यामुळे
त्याची चामडी पांढरी पडत असते...

गरीबाने शरीराचे चोचले
न पुरविल्यामुळेच त्याचे जीवन संपत असते ,
श्रीमंताने शरीराचे चोचले
अधिक पुरविल्यामुळे त्याचे जीवन संपत असते...

जीवन

                जीवन हे मोजकच असतं ,
                ते रडत कधी जगायच नसतं .

सुख दुःखाने आयुष्य घडत असतं ,
आपल्या दुःखाने कधी रडायच नसतं .

               संकटांना तोंड दयायच असतं ,
               पाठ फिरवून कधी घाबरायच नसतं .

कधी काही हरवतं तर कधी काही सापडतं ,
पण हरवल्याच दुःख कधी बाळगायच नसतं .
      
             दुसरयासाठी आपणही थोड सुख विसरायच असतं ,
             कारण आपल्याला हवं ते सगळं आपल्याला मिळत नसतं .

जीवन हे एकदाच जगायचं असतं ,
मरणानंतरही आपलं नाव इतरांना विसरु दयायच नसतं .

            आपल जीवन आपणच घडवायच असतं ,
            फुलासंगे फुलायचं की मातीसंगे मिसळायचं ते आपणच ठरवायच असतं .
                          - Sushant_R._Kanase

सांगा कसं जगायचं …??

                सांगा कसं जगायचं ?
       कण्हत कण्हत की गाणं म्हणत
                   तुम्हीच ठरवा..!

           डोळे भरून तुमची आठवण
             कोणीतरी काढतंच ना ?
                ऊन ऊन दोन घास
             तुमच्यासाठी वाढतंच ना ?
      शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
                      तुम्हीच ठरवा..!

              काळ्याकुट्ट काळोखात
             जेंव्हा काही दिसत नसतं
               तुमच्यासाठी कोणीतरी
              दिवा घेऊन ऊभं असतं
     काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
                      तुम्हीच ठरवा..!

           पायात काटे रुतून बसतात
                हे अगदी खरं असतं,
             आणि फुलं फुलून येतात
                  हे काय खरं नसतं ?
काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं
                      तुम्हीच ठरवा..!

                पेला अर्धा सरला आहे
                असं सुद्धा म्हणता येतं
                 पेला अर्धा भरला आहे
                असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
                     तुम्हीच ठरवा..!

                 सांगा कसं जगायचं ?
          कण्हत कण्हत की गाणं म्हणत
                     तुम्हीच ठरवा..!
                          *** ***
            शब्द: मंगेश पाडगांवकर

आयुष्य…!!

आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं....!
रिकामं तर रिकामं,
लिहिलं तर छान असतं...!

शेवटचं पान मृत्यू अन्
पहिलं पान जन्म असतं...!
मधली पाने आपणच भरायची,
कारण ते आपलंच कर्म असतं...!

होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं,
कुठलंच पान कधी गाळायच नसतं....!
चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं,
कारण त्यातूनच
आपल्याला पुढे शिकायचं असतं.....!

नाती जपण्यात मजा आहे
बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे
जुळलेले सूर गाण्यात मजा आहे
येताना एकटे असलो तरी
सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे

नशीब कोणी दुसरं लिहित नसतं
आपल नशीब आपल्याच हाती असतं
येताना काही आणायच नसतं
जाताना काही न्यायचं नसतं
मग हे आयुष्य तरी
कोणासाठी जगायचं असतं
याच प्रश्नाचे उत्तरशोधण्यासाठी
जन्माला यायचं असतं

             - मंगेश पाडगावकर.

चारोळ्या

चमकणाऱ्या काजव्यांना
रात्रीचा अंधार घालवता येत नाही,
आणि त्या रात्रीला देखील
काजव्यांचा प्रकाश लपविता येत नाही.

हात तुझा हाती होता..

हात तुझा हाती होता..
काहीच फरक नाही पडला..
मृत्यु उभा माझ्या दारी होता..
बस..

सुखी आयुष्य…

आपण नाटक पहायला गेलो तर पुढली सीट मागतो आणि सिनेमा पहायला गेलो की मागची.
तुमच जगातल स्थान असच सापेक्ष असत !
ते अविचल कधीच नसत …!
साबण बनवायला तेल जरूरी आहे आणि तेल काढायला साबणच लागतो !
हा अटळ विरोधाभास आहे…!
जगात दोनच प्रकारची माणसे आनंदात असतात !

आठवणी मैत्रीच्या…

शाळा.. आणि पावसाळा..

जगा आनंदाने…

"एक छिद्र उरलेलं"

महाभारतातील ही गोष्ट

एक गरीब म्हातारा हस्तिनापूरला गेला.

काहीतरी दान मिळेल या आशेनं तो धर्मराजाला भेटला.

परंतु, तोपर्यंत सूर्यास्त झाला होता.

त्यानं धर्मराजाला काहीतरी दान द्यावं अशी विनंती केली.

तेव्हा धर्मराज त्याला म्हणाले,

'आता सूर्यास्त झाला आहे. त्यामुळे मी आता दान देवू शकत नाही. तू उद्या सूर्योदयानंतर केव्हाही ये. मी तुला निराश करणार नाही.'

तो गरीब म्हातारा नाराज होवून परत फिरला.

या दोघांमधला संवाद बाजूला बसलेले भीमसेन ऐकत होते.

तो गरीब म्हातारा निघून गेल्यानंतर भीमसेन धर्मराजाला म्हणाले,

'दादा, तुम्ही त्या याचकाला उद्या सकाळी दान देण्याचं वचन दिलं आहे. पण, एक विचारू? माणसाला दुसऱ्या दिवशीच्या आयुष्याची खात्री देता येते?'

धर्मराजाला स्वतःची चूक कळली.

त्यांनी लगेच त्या गरीब म्हाताऱ्याला बोलावलं आणि भरपूर दान दिलं.

गोष्ट इथं संपली....

पण, भीमानं विचारलेला हा प्रश्न छोटासा असला तरी, अस्वस्थ करणारा आहे.

आणि हा प्रश्न जो स्वतःला विचारतो, त्याला आयुष्याचं खरं महत्त्व कळतं.

'तो काल मला भेटला होता, आज तो नाहीये',

'तो मघाशी माझ्याशी फोनवर बोलला होता, आत्ता तो नाहीये.'

असे अनेक प्रसंग आपल्या आजूबाजूला नेहमी घडत असतात.

हा क्षण माझा आहे.

पुढचा क्षण माझा नाही, हे एकदा का आपण आपल्या मनात रूजवले की, संताप, चीड, द्वेष, मत्सर या सगळ्या भावना आपोआप गळून पडतात आणि हातात राहते ते सूर ताल, लय, ठेका घेवून आलेलं आयुष्याचं रंगीबेरंगी गाणं!

जी मोठी माणसं किंवा नेते मंडळी असतात, ते गेल्यानंतरही त्यांचे चौकात पुतळे होतात.
जे शास्त्रज्ञ, विचारवंत असतात, त्यांचे विचार आपल्याला ते गेल्यानंतरही पुस्तकातून भेटतात.

जे कलावंत, गायक, खेळाडू असतात, ते गेल्यानंतरही ते त्यांच्या कलेतून, कृतीतून आपल्याला आठवतात.

पण आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काय?

शरीरातून जीव गेल्यानंतर कुठे असतो आपण?

कुठल्या रूपात मागे उरतो आपण?

माझ्या घरात आज मी आहे.

उद्या मी नसेन.

माझ्या जागी एक मिणमिणता दिवा असेल.

दहा दिवसांनी तो दिवा विझेल.

मग, त्या जागी माझा एक फोटो असेल.

लाकडी चौकट, कोरीव नक्षीकाम, हसरा फोटो.

काही दिवसांनी माझ्या लटकलेल्या फोटोवर साचलेली धूळ असेल किंवा त्या फोटोची पातळ काच वेडीवाकडी तडकलेली असेल.

काही वर्षांनी माझा तो हसरा फोटो भिंतीवरच्या छिद्रातून खिळ्यासकट निखळलेला असेल...

आणि मग त्यानंतर पिढ्यान् पिढ्या, माझ्याच घरात, माझ्या नावाचं फक्त उरलेलं एक छिद्र असेल !

आपलं रूपांतर अशा छिद्रात होण्यापूर्वी आपल्याला दानात मिळालेल्या ह्या श्वासांच रूपांतर आपण 'उत्सवात'  करायचं का?...                                                    
इतिहास सांगतो काल सुखी होतो.

भविष्य सांगतं उद्या सुखी असशील.

पण...

तुमचे मन आणि विचार चांगले असेल, तर रोजच सुख आहे... नाही का ?

तर, मग,
जगा आनंदाने !!!